(प्रचंड आवाजात, अचाट लोकांची गर्दी, खूप गोंधळ खरं तर कल्ला, लाउड स्पीकरचा आवाज…मुंगळा…गाणं
चालू……एक रथ रस्त्यावरून निघालेला असतो …फ़क्त त्यातली गणपतीची मूर्ती गायब
….लोकांना मात्र त्याचा पत्ता नाही….. तेवढ्यात आवाज …….हॅलो …हॅलो …हंहंहं …..मोठ्यांदा बोला ….एकू येत नाहिये …कोणीतरी फोनवर बोलायचा प्रयत्न करतंय…चक्क गणपती धावत गर्दीच्या बाहेर …फोनवर बोलत येतोय….)
– हंहं….बोला ना बाबा…अहो आवाज नाही येते ऐकू काहीच ….. सुपाएवढे कान आहेत … म्हणून काय अहो
…….तुम्हाला काय सांगू …. मला काही कळात नाहिये…. काय करू सुचत नाहिये म्हणून तुम्हाला फोन केलाय.- सगळ्याचं उत्तर ? वगैरे काहीही नाहिये माझ्याकडे ….

– का काय का? … मुंगळा नावाचं गाणं चालू आहे …सांगा आता ते मी का एकू ?

– अरे हो हो…. नाही कारण सांगा …दर्दी रब रब … म्हणजे काय…. सांगा
अर्थ…नाही मला आत्ताच्या अत्ता

– मला आधी कधीच नाही शिकवलं तुम्ही हे ….. आता ….मला सांगा ताबडतोब

– अजिबात पटलं नाहिये …काहीतरी…आता ऐकणार आहात तुम्ही…..प्रचंड आवाजाचा त्रास होऊन 2०००० लोक मरणाच्या दारात, ५-७ इमारती जमीनदोस्त

– काही काय …येउन बघा ……… तुमचं ठीक आहे, महाशिवरात्र १ दिवस असते …गणेशोत्सव १० दिवस असतो …शिवाय पुढच्या वर्षी लवकर या म्हणतात हे ….कसं शक्य आहे

– मी …..शांत कसा होऊ …अणि तुम्ही सांगत आहात …. चक्क शांत हो….माझा विश्वास बसत नाहीये….- अहो पण
मग याला पर्याय काय

– छे ..छे जाऊ दे ..नाही – विषय बदलू नका …मोदक वगैरे ठीक आहे हो पण या प्रश्नाचे उत्तर…

– नहिच्चे उत्तर … म्हणजे…… तुमच्यासाठी सुद्धा हे …….इतकी वर्ष न सुटलेल कोडंच आहे ..