Author: Nandita Gadgil
-
असो………!!!!!!!!!!!!!!!!!!
सर्वसामान्य माणसाच्या तोंडचा तद्दन गुळमुळीत उद्गार……!!!! सदैव मान खाली घालून पांढरं निशाण हातात घेतलेला पवित्रा….!!!!कितीही काहीही आणि कुठेही घोडचूक होताना दिसली तरी आपण सहज हा हतबल उद्गार काढून; चला इथून पुढच्या पानावर असं म्हणून मोकळे होतो. घटना कुठलीही असो, उद्गार remains constant. म्हणजे काल संध्याकाळी आणलेली कांद्याच्या पात खराब निघाली…
-
माझिया बगिचात ….
माझिया बगिचात, होई रंगांची बरसात स्वप्न बाबांचे सत्यात, उतरले …१ माझिया बगिचात, डुले जास्वंदी गुलाब लाडकोड आई त्यांचे, पुरविते …२ माझिया बगिचात, रातराणी सुगंधली दिनरात मोहरली, प्रेमभावे …३ माझिया बगिचात, सदा पडे तगरीचा लाजे चांदणे तयाने, आभाळात …४ माझिया बगिचात, येती कमळाच्या ज्योती ज्ञान-कलेची समृद्धी, त्यांच्यासवे …५ माझिया बगिचात, हळदी-कुंकू…
-
कळूनही केला गुन्हा
शब्द होते सांधलेले, गीत होते बांधलेले अंतरीच्या काळजाचा वेध होता घेतलेला खेळ होता जीवघेणा, कळूनही केला गुन्हा । । १ । । सूर होते छेडलेले, तान होती घेतलेली स्वरलयींच्या कंपनाचा, मेळ होता घातलेला स्वप्न ते स्मरल्याविना, कळूनही केला गुन्हा । । २ । । डाव होता मांडलेला, जीत होती खेचलेली…
-
प्रिय कुसुमाग्रज

!!श्री!! प्रिय कुसुमाग्रज, सादर नमस्कार पत्र लिहिण्यास कारण… खरं तर काहीच नाही…आणि म्ह्टलं तर खूप काही. तसा तुमच्याशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ पण तुमचे ‘पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा’ हे शब्द आमच्यासोबत आहेत ते अगदी बाकावर बसून पाठ्यपुस्तकातील कविता पाठ होईपर्यंत वाचली तेव्हापासून. तुमच्या कविता…
-
न सुटलेलं कोडं
(प्रचंड आवाजात, अचाट लोकांची गर्दी, खूप गोंधळ खरं तर कल्ला, लाउड स्पीकरचा आवाज…मुंगळा…गाणं चालू……एक रथ रस्त्यावरून निघालेला असतो …फ़क्त त्यातली गणपतीची मूर्ती गायब ….लोकांना मात्र त्याचा पत्ता नाही….. तेवढ्यात आवाज …….हॅलो …हॅलो …हंहंहं …..मोठ्यांदा बोला ….एकू येत नाहिये …कोणीतरी फोनवर बोलायचा प्रयत्न करतंय…चक्क गणपती धावत गर्दीच्या बाहेर …फोनवर बोलत येतोय….)…
-
स्मृति
जगण्याला सुरुवात कुठे केली, विरहाची ही वेळ जवळी आली. श्वास अडला, भेट त्वरे सरली, परदेशास गाड़ी निघोनी गेली. झोप उडली, ड़ोळ्याशी नाही डोळा, तव स्मृति ही अश्रूत व्यूक्त झाली. हास्य ओठावर खोटे जरिही आणले, वेदनेला हृदयात दडविलेले. दिवस आले आणि कितिक गेले, मन स्मरणात अजुनि झुरत आहे. किती ठरवूनही न…
-
मज लोभस हा इहलोक हवा
जगण्याची अतोनात इच्छा असावी तर बा भ बोरकरांसारखी, स्वर्ग न मागता ते इहलोक मागतात, इथला हर्ष न शोक त्यांना हवासा वाटतो. शंतनुचा मोह, ययातिचा देह न् पार्थाचा संदेह ते मागतात. इंद्राचा भोग आणि चंद्राचा ह्रुद्रोग हवा असतो, सुखाची अपेक्षा करत असताना दुःख दे आणि सोसायचे धैर्य दे म्हणून ते थांबत…
-
कसा मी कळेना…
क्वचित कधीतरी एखादी ओळ मनात घर करून जाते … कसा मी कळेना या विंदा करंदीकर यांच्या कवितेतील असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी माणसाची स्वतःशी असणारी ओळख किती अनोळखी असते …विंदा खूप सुंदर वर्णन करतात, कधी एखादं कस्पट तर कधी अवघं आकाश कधी सत्य…
-
गिनीपिग
सगळं तसं नेहमीसारखंच चालू होतं, या खांबावरून त्या खांबावर उड्या मारणं, या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पळणं. समोर येणारे वेगवेगळे पदार्थ खाणं, कोणीतरी कधीतरी काहीबाही चौकशी करायला यायचं… सहज गप्पा मारून जायचं. पण फारसा काही बदल झालेला जाणवला नाही. असोत कोणीही आपल्याला काय करायचंय येतील जातील… जाओत बापडे! आपण आपल्या नित्य…
-
माउली नाम
कष्ट साहिले, स्वप्नं पहिले सोनसकाळी घरटे सजले… गोकुळ भरले, शिवार नटले आकाक्षांना धुमार फुटले… आले वारे, गेले वारे समृद्धीचे घन ओसरले… मास ही सरले, अंकुर नुरले ऋणाऋणाचे डोंगर झाले… कंठ दाटले, झुकल्या माना उमजे भुईचा निर्भय बाणा… थकले नांगर, थिजले स्पंदन आत्मघातकी विचारमंथन… तत्क्षणी स्मरले माउली नाम विरली छाया प्रकाश…