-
When I started cooking I tried Pav-bhaji… And cook this dish till date and find it very easy to cook and delicious to taste. Now as I was about to choose a snap…I see that I have never clicked a photo of this dish… So, it adds to my to do list!! I always had
-
The Journey Before the Journey My journey to Japan wasn’t just about visiting a new country — it was born from a deep fascination with the principles, methodologies, culture, language, and spirit of Japan. Professionally, I had come across concepts like Kaizen (continuous improvement) and the 5S methodology, which left a lasting impression on me.
-
पावसाची सर नुकतीच येऊन गेली, वाऱ्याचा उनाडपणा चालूच होता. कितीदातरी वाद झाला, तरी त्याचं आणि शेताचं एकमेकांशिवाय पानही हलत नाही हे अगदी खरं. त्यामुळे त्यांच्या दंग्याची मजा मीही मनापासून लुटत होते. त्यांची ‘झुळूक’ आणि ‘सुळूक’ ची भाषा आता मलाही काही नवी नाही, त्यामेले त्यांच्यातलीच एक बनत थांबत थबकत मधेच वळत निघाले होते नेहमीसारखी आणि अचानक
-
एखाद्या ठिकाणी प्रथमतः जाणं आणि पुन्हा एकदा जाणं यात किती फरक असतो! पहिल्यांदा जाताना जागा, वस्तू, झाडं, पानं, फुलं, हवा, निसर्ग, भव्यता दिव्यता …एवढच कशाला, हल्ली सोई –सुविधा, show चा जमाना त्यामुळे दिखाऊ वैभव …या सार्या गोष्टींमध्ये interest असतो rather कुतूहल किंवा attraction असतं असं म्हणू हवं तर! पण त्याच ठिकाणी पुन्हा गेलो की त्याचं
-
कर्तव्य मानून कर्मे क्रमिली फळे नित्य वैताग साऱ्या प्रसंगी जीवा दु:ख मानू नको त्या कृतींचे दुःखे तुझी ती नशिबाच्या नशिबी कधी काय कोठे नि कैसे करिशी उद्याचे भय नेई निद्रा लयासी जीवा सत्वरी सोड चिंता उद्याची कधी काळ दोन्ही न् जातील संगती मनस्वीच बुद्धी मनस्वीच वाचा जये कल्पिती सार अविचार साचा जीवा घोर वाहू नको
-
मनाची समजूत काढलेली आहे कायमचीच; शिकवूनच ठेवलंय त्याला, बिनधास्त विश्वास ठेव आनंदावर आणि घे जोरात टाळी. काळजीच नको, याच जन्मात सुटणार आहेत चिंतांची जाळी. हं , उगीच भीतीच काहूर-बिहूर म्हणून सहानुभूती मिळव. पण किंचित समाधान सोबत घेऊन सुखाच्या कल्पनाही रंगव. अगदी रडावंसंच वाटलं तरी लाज वाटण्यासारखं काही नाही. उगीच कोणी पाहिल म्हणून आपलं दाटणं थांबवायचं
-
सर्वसामान्य माणसाच्या तोंडचा तद्दन गुळमुळीत उद्गार……!!!! सदैव मान खाली घालून पांढरं निशाण हातात घेतलेला पवित्रा….!!!!कितीही काहीही आणि कुठेही घोडचूक होताना दिसली तरी आपण सहज हा हतबल उद्गार काढून; चला इथून पुढच्या पानावर असं म्हणून मोकळे होतो. घटना कुठलीही असो, उद्गार remains constant. म्हणजे काल संध्याकाळी आणलेली कांद्याच्या पात खराब निघाली तरी असो आणि कालपरवा पर्यंत
-
माझिया बगिचात, होई रंगांची बरसात स्वप्न बाबांचे सत्यात, उतरले …१ माझिया बगिचात, डुले जास्वंदी गुलाब लाडकोड आई त्यांचे, पुरविते …२ माझिया बगिचात, रातराणी सुगंधली दिनरात मोहरली, प्रेमभावे …३ माझिया बगिचात, सदा पडे तगरीचा लाजे चांदणे तयाने, आभाळात …४ माझिया बगिचात, येती कमळाच्या ज्योती ज्ञान-कलेची समृद्धी, त्यांच्यासवे …५ माझिया बगिचात, हळदी-कुंकू कर्दळीचे येणा-जाणाऱ्या सुखावे, नजरेने …६
-
शब्द होते सांधलेले, गीत होते बांधलेले अंतरीच्या काळजाचा वेध होता घेतलेला खेळ होता जीवघेणा, कळूनही केला गुन्हा । । १ । । सूर होते छेडलेले, तान होती घेतलेली स्वरलयींच्या कंपनाचा, मेळ होता घातलेला स्वप्न ते स्मरल्याविना, कळूनही केला गुन्हा । । २ । । डाव होता मांडलेला, जीत होती खेचलेली उन्मादलेल्या गर्जनांचा, माज होता चढ़विलेला
-
!!श्री!! प्रिय कुसुमाग्रज, सादर नमस्कार पत्र लिहिण्यास कारण… खरं तर काहीच नाही…आणि म्ह्टलं तर खूप काही. तसा तुमच्याशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ पण तुमचे ‘पाठीवरती हात ठेउन नुसते लढ म्हणा’ हे शब्द आमच्यासोबत आहेत ते अगदी बाकावर बसून पाठ्यपुस्तकातील कविता पाठ होईपर्यंत वाचली तेव्हापासून. तुमच्या कविता वाचण्यात अन त्यावर अर्थ कळेपर्यंत
-
(प्रचंड आवाजात, अचाट लोकांची गर्दी, खूप गोंधळ खरं तर कल्ला, लाउड स्पीकरचा आवाज…मुंगळा…गाणं चालू……एक रथ रस्त्यावरून निघालेला असतो …फ़क्त त्यातली गणपतीची मूर्ती गायब ….लोकांना मात्र त्याचा पत्ता नाही….. तेवढ्यात आवाज …….हॅलो …हॅलो …हंहंहं …..मोठ्यांदा बोला ….एकू येत नाहिये …कोणीतरी फोनवर बोलायचा प्रयत्न करतंय…चक्क गणपती धावत गर्दीच्या बाहेर …फोनवर बोलत येतोय….) – हंहं….बोला ना बाबा…अहो आवाज
-
जगण्याला सुरुवात कुठे केली, विरहाची ही वेळ जवळी आली. श्वास अडला, भेट त्वरे सरली, परदेशास गाड़ी निघोनी गेली. झोप उडली, ड़ोळ्याशी नाही डोळा, तव स्मृति ही अश्रूत व्यूक्त झाली. हास्य ओठावर खोटे जरिही आणले, वेदनेला हृदयात दडविलेले. दिवस आले आणि कितिक गेले, मन स्मरणात अजुनि झुरत आहे. किती ठरवूनही न सुचे काही, मन प्रेमाच्या दुनियेत